नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात KYC बद्दल माहिती घेणार आहोत. KYC म्हणजे काय, KYC साठी कोणती कागदपत्रे लागतात व KYC ची गरज काय आहे हे सर्व आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. भारताच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सर्व बँक, वित्तीय संस्थाने, असे सर्व गोष्टी जेथे वित्तीय व्यवसाय (Financial Transactions) होतो तेथे KYC अनिवार्य केले आहे.
केवायसी म्हणजे काय? – What is KYC
KYC ही ग्राहकांची ओळख पडताळणी करण्याची एक प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्थाने, जसे बँकद्वारे वापरली जाते. KYC (Know Your Customer) म्हणजे आपला ग्राहक जाणून घेणे. भारत सरकार ने 2002 मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती आणि 2004 मध्ये सर्व बँक ने ही प्रक्रिया अवलंबावी अशी घोषणा केली होती. KYC सर्वात प्रथम Reserve Bank of India मध्ये 2005 रोजी ग्राहकांसाठी KYC ची सुरुवात केली.
उदा. बँकेत खाते सुरू करते वेळी बँक आपल्याला काही कागदपत्रे मागते, त्यात आपली ओळख, पत्ता असलेले Document असते, यालाच KYC प्रक्रिया असे म्हणतात. ग्राहकांची ओळख तपासणी करण्यासाठी बँक कागदपत्रे मागत असते. KYC चा उपयोग फक्त बँकेत नाही तर, ऑनलाईन शॉपिंग साईट्स, Mutual Funds Account, डिमॅट अकाउंट ओपन करतानाही केला जातो.
नवीन सिम कार्ड घेताना आपले आधार कार्ड तपासले जाते याला सुद्धा KYC प्रक्रिया म्हणतात. वाढत चाललेली धोकेबाजी रोखण्यासाठी सरकारने हा निर्माण घेतला होता, यामुळे कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या नावाचा दुरुपयोग नाही करू शकणार व Money Laundering सारख्या बेकायदेशीर गोष्टींना आळा बसेल.
केवायसी फुल फॉर्म – KYC Full Form
KYC चा फुल फॉर्म “Know Your Customer” असा होतो. मराठी मध्ये याचा अर्थ “आपल्या ग्राहकास जाणून घ्या” असा होतो. सर्व बँक किंवा असे ठिकाणे जेथे Financial Transaction केले जातात त्यांना सर्वांना ग्राहकाबद्दल माहिती घेण्याचा अधिकार असतो. ग्राहकांची माहिती घेऊन त्यांची ओळख पडताळणी केली जाते.
केवायसी चे प्रकार – Types of KYC in Marathi
आपण वरती पाहिले की KYC प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने करणे शक्य आहे, यावरूनच KYC चे दोन Types पडलेले आहेत.
१) EKYC
ई-केवायसी चे पूर्ण नाव Electronic Know your Customer असा होतो. EKYC प्रक्रिया कागद विरहित असते. ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाते व यात भौतिक स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता नसते.
२) CKYC
CKYC चे पूर्ण नाव Central Know your Customer असा होतो. ही प्रक्रिया भारतातील सर्व बँकेत वापरली जाते, त्यामुळे याला Central KYC म्हणतात. CKYC प्रक्रियेत बँकेत कागदपत्रे जमा करून फॉर्म भरून द्यावा लागतो.
केवायसी (KYC) करणे का गरजेचे आहे? – Importance of KYC
आपल्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल तर बँकांना आपल्या ग्राहकांकडून KYC करून घेण्याची गरज का पडली? जेंव्हा ग्राहक बँकेत खाते खोलतो त्यावेळेस तो वयक्तिक माहिती जसे नाव, पत्ता, ई बँकेला सांगतो. पण दिलेली माहिती खरी आहे का खोटी हे बँकेला माहिती होण्यासाठी ठोस पुरावा द्यावा लागतो. याने बँकेला कळते की ग्राहकाने दिलेली माहिती खरी आहे. यासाठीच सर्व वित्तीय संस्थानात KYC अनिवार्य केलेली आहे. पैशांची धोकेबाजी, Money Laundering अश्या गोष्टींना रोखण्यासाठी KYC महत्वाची असते. KYC प्रक्रिया ने व्यक्तीची Financial History बद्दल कळते. KYC केल्याशिवाय बँकेत खाते खोलता येत नाही, Mutual Funds मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. केवायसी (KYC) Verification करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
धन्यवाद🙏, माहिती आवडल्यास नक्की इतरांना share करा.
- नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल अवश्य जॉईन करा.
- 👇
- संकल्प मराठी
- कर्मचाऱ्यांच्या किमान पगार मर्यादेत वाढ होऊ शकते. एका उच्चस्तरीय समितीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- 5Hp सोलर पंप 3 लाख 25 हजार रुपये नविन GR आला.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार पण या यादीत नाव असेल तरच.
- गाय/म्हैस गोठा अनुदान योजना | शेळी पालन शेड 100%अनुदान योजना सुरु.
- 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान फक्त ह्याच वर्षांतील शेतकऱ्यांनाच मिळणार.
- बांधकाम कामगार योजना 2022 | अर्ज करा लाभ मिळवा.
- भुमी अभिलेख: सरकारी जमीन मोजणी संपूर्ण माहिती.
- PM किसान योजना eKYC आत्ता करा घरच्या घरी | PM Kisan eKYC